
अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील समस्या पुन्हा ऐरणीवर आल्याचा दावा करत बारामतीकरांनी पवार कुटुंबीयांना खुलं पत्र लिहिलं आहे. विकासकामांकडे लक्ष देण्यासोबतच वाढत्या गुन्हेगारीवरही तातडीने लक्ष देण्याचं आवाहन या पत्रातून करण्यात आलं आहे.
शरद पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या नावे हे आवाहन करण्यात आलं असून, “अजितदादांच्या निधनानंतर बारामती पोरकी झाली,” अशी भावना पत्रातून व्यक्त करण्यात आली आहे. बारामतीतील विकासकामं आणि नागरिकांच्या समस्यांकडे पवार कुटुंबीयांनी गांभीर्याने लक्ष द्यावं, अशी मागणी या पत्रातून करण्यात आली आहे.

