

मराठवाड्यातील नवीन कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले. त्यामुळे काही निवडून आलेले लोकप्रतिनिधी अडचणीत आले. 15 लाख रुपयांसाठी हे प्रमाणपत्र रद्द करण्याचा गंभीर आरोप मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला. अंतरवाली सराटीत त्यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोपांची राळ उडवून दिली. कुणाच्या आदेशाने कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले याचे नावच त्यांनी उघड केले. कोणत्या मंत्र्यांच्या आदेशाने हे प्रमाणपत्र रद्द करण्यात आले हे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
बातमी अपडेट होत आहे…

